फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलींमुळे हिंदू आजही भयाच्या सावटाखाली !
|

नवी देहली – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायदा यांच्याविरोधात देहलीमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये धर्मांधांनी दंगली घडवल्या होत्या. धर्मांधबहूल भागांमध्ये झालेल्या या दंगलींमध्ये एकूण ५३ लोकांना जीव गमवावा लागला होता, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. या भागांत रहाणार्या हिंदूंच्या मनावर आज दोन वर्षांनंतरही अत्याचारांच्या जखमा ताज्या आहेत. आजही या भागांतून त्यांचे पलायन चालूच आहे.
यावर पोलिसांचे साहाय्य घेण्यासाठी पीडित हिंदु कुटुंबांनी एका ‘पोलीस सार्वजनिक बैठकी’चे आयोजन केले होते. पूर्वोत्तर देहलीचे पोलीस उपायुक्त संजय सेन यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत पीडित हिंदु कुटुंबांनी त्यांना पलायन करण्यास भाग पाडणारी कारणे कथन केली. यावर पोलीस उपायुक्त सेन यांनी हिंदूंना आश्वस्त केले की, त्यांची समस्या सोडवण्यासाठी एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच ‘दुसर्या समाजा’तील लोकांशीही या समस्येवर चर्चा केली जात आहे. (‘दुसरा समाज’ म्हणजे कोण, हे पोलिसांनी स्पष्ट केले पाहिजे ! – संपादक) २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींसंदर्भात देहली उच्च न्यायालयाने सांगितले होते की, या दंगली अचानक झाल्या नसून ते एक पूर्वनियोजित षड्यंत्र होते.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त