फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलींमुळे हिंदू आजही भयाच्या सावटाखाली !
|

नवी देहली – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायदा यांच्याविरोधात देहलीमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये धर्मांधांनी दंगली घडवल्या होत्या. धर्मांधबहूल भागांमध्ये झालेल्या या दंगलींमध्ये एकूण ५३ लोकांना जीव गमवावा लागला होता, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. या भागांत रहाणार्या हिंदूंच्या मनावर आज दोन वर्षांनंतरही अत्याचारांच्या जखमा ताज्या आहेत. आजही या भागांतून त्यांचे पलायन चालूच आहे.
यावर पोलिसांचे साहाय्य घेण्यासाठी पीडित हिंदु कुटुंबांनी एका ‘पोलीस सार्वजनिक बैठकी’चे आयोजन केले होते. पूर्वोत्तर देहलीचे पोलीस उपायुक्त संजय सेन यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत पीडित हिंदु कुटुंबांनी त्यांना पलायन करण्यास भाग पाडणारी कारणे कथन केली. यावर पोलीस उपायुक्त सेन यांनी हिंदूंना आश्वस्त केले की, त्यांची समस्या सोडवण्यासाठी एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच ‘दुसर्या समाजा’तील लोकांशीही या समस्येवर चर्चा केली जात आहे. (‘दुसरा समाज’ म्हणजे कोण, हे पोलिसांनी स्पष्ट केले पाहिजे ! – संपादक) २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींसंदर्भात देहली उच्च न्यायालयाने सांगितले होते की, या दंगली अचानक झाल्या नसून ते एक पूर्वनियोजित षड्यंत्र होते.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court