
१. ‘घरासंबंधी अनेक अडचणी येत असतांना एका व्यक्तीने आम्हाला कुलदेवीचे दर्शन घेण्यास सांगितले होते. नंतर कोणतीही अडचण न येता लगेच आमचे कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन झाले. गाडीने प्रवास करतांना माझ्या मनात विचार आला, ‘एखादा पक्षी किंवा प्राणी ‘शुभसंकेत’ म्हणून दिसावा.’ थोड्याच वेळात मला मोर दिसला.
२. तुळजापूर येथे गेल्यावर श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पुजारी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गाभार्यात घेऊन जात होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आम्हाला देवीकडे घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. आम्हाला अगदी जवळून देवीचे दर्शन झाले. त्या वेळी गाभार्यात इतर कुणीही भक्त नव्हते.
३. मंदिराच्या बाहेर आल्यावर कळसाचे दर्शन घेतांना कळसाच्या ठिकाणी मला श्री दुर्गादेवीचे दर्शन झाले आणि तेथे चालतांना ‘पायाखालचे काहीतरी (त्रासदायक) नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.
४. मंदिराच्या आवारात बसून नामजप करतांना कळसाकडे पाहिल्यावर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे दर्शन झाले.’
– श्री. अमर सांगळे, मुंबई (२६.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !