सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या पंचायतराजमधील आरक्षणावर गदा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने कृष्णा नदीच्या पात्रात आंदोलन करण्यात आले.

सांगली, ३ जून – ओबीसींच्या अधिकाराविषयी शासनाची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिलेली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या पंचायतराजमधील आरक्षणावर गदा आली आहे. राज्य सरकार असंवेदनशील आहे. राज्यातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज आहे. याचे मूल्य सरकारला चुकवावे लागणार आहे, असे प्रतिपादन भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी केले. भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ३ जून या दिवशी कृष्णा नदीच्या पात्रात उभे राहून आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, स्थायी समिती सभापती पांडुरंग, माजी आमदार नितीन शिंदे, माजी महापौर संगिता खोत, नगरसेवक प्रकाश ढंग, तसेच अन्य उपस्थित होते.