
मुंबई – मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने पुढील दिशा दाखवली आहे. न्याय कुठे मिळेल ? याचे मार्गदर्शन न्यायालयाने केले आहे. आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकारी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना विनंती करतो की, त्यांनी मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय तात्काळ घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ५ मे या दिवशी मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी ‘ऑनलाईन’ संवादाद्वारे उद्धव ठाकरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करतांना वरील आवाहन केले. यासाठी ६ मे या दिवशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Maratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्रीhttps://t.co/AzfJP1zzzC#CMUddhavThackeray #UddhavThackerayonMarathaReservation #SupremeCourt #MarathaReservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन आपणाला हवे ते साहाय्य करू. मराठा समाज सहनशील आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. आपण याचा अनादर करणार नाही, याची निश्चिती आहे.’
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन