
मुंबई – मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने पुढील दिशा दाखवली आहे. न्याय कुठे मिळेल ? याचे मार्गदर्शन न्यायालयाने केले आहे. आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकारी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना विनंती करतो की, त्यांनी मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय तात्काळ घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ५ मे या दिवशी मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी ‘ऑनलाईन’ संवादाद्वारे उद्धव ठाकरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करतांना वरील आवाहन केले. यासाठी ६ मे या दिवशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Maratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्रीhttps://t.co/AzfJP1zzzC#CMUddhavThackeray #UddhavThackerayonMarathaReservation #SupremeCourt #MarathaReservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन आपणाला हवे ते साहाय्य करू. मराठा समाज सहनशील आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. आपण याचा अनादर करणार नाही, याची निश्चिती आहे.’
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !