
सांगली, २० एप्रिल – केंद्र सरकारने संपूर्ण भारतभर सांसर्गिक रुग्णालय उभारणार असल्याचे घोषित केले आहे. त्याअनुषंगाने या रुग्णालयांमध्ये सांगलीचा समावेश करावा, असे निवेदन शिवसेनेचे जितेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखाली मिरज मतदारसंघातील भाजप आमदार सुरेश खाडे यांना देण्यात आले. या वेळी अनिल शेटे, पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, लक्ष्मण वडर, प्रकाश लवटे, सुशांत मधाळे, सुरेश सपकाळ इत्यादी उपस्थित होते. सदरचे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे.
आमदार खाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी हा देशातल्या इतर हवामानाच्या तुलनेत ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो. त्या अनुषंगाने याठिकाणी केंद्र सरकारने तात्काळ ५ सहस्र खाटांचे संसर्गित रुग्णालय स्थापन करावे. याचा लाभ परिसरातील ८ ते १० जिल्हे आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांना होणार आहे. तरी केंद्र सरकारने सांगलीसाठी सदरचे रुग्णालय तात्काळ संमत करावे.
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
Kerala Shigella Outbreak Reported : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !