कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुढीपाडव्यानिमित्त मिरवणूक काढण्यास शासनाकडून बंदी

मुंबई – १३ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने नियमावली घोषित केली आहे. यामध्ये मिरवणूक किंवा वाहनफेरी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गुढीपाडवा आपल्या घरी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.