
‘भगवंताला भेटावे’, असे कुणाला नाही वाटणार ? त्याप्रमाणेच ‘आपल्या प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटावे’, असे कुणाला नाही वाटणार ? ‘प्रत्येकच साधकाला प.पू. गुरुदेवांना स्थुलातून भेटावे, त्यांच्याशी बोलावे, त्यांना पहावे, त्यांचे दर्शन घ्यावे’, असेे वाटणे साहजिकच आहे. आपण त्यांच्या प्रीतीमुळेच तर साधनेत आहोत ना ! त्यांनी त्यांच्या प्रेमपूर्वक धाग्याने आपल्याला फुलाप्रमाणे गुंफून त्यांच्या हृदयाशी ठेवले आहे ना !; पण त्यांची प्रकृती बरी नसते. त्यामुळे आपल्याला त्यांना भेटायला मर्यादा येते. आपल्या मनात त्यांना भेटण्यासाठी रूखरूख लागलेली असते. आपल्या प्रिय गुरुमाऊलींनी साधकांना वाटणारी ही खंत आधीच जाणली आहे. त्यामुळेच त्यांनी आधीच लिहून ठेवले आहे,
‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा…. ।’
यातून ‘प.पू. गुरुदेवांना आपल्याला त्यांच्या स्थूल रूपात अडकू द्यायचे नाही’, हे लक्षात येते. स्थुलातून प्रत्यक्ष भेटत असल्याची अनुभूती आपण ‘सूक्ष्मातून भेटून कशी घेऊ शकतो ?’, हे आपल्याला पुढील कवितेतून शिकता येते.
एकदा एका साधकाला ‘प.पू. डॉक्टरांना स्थुलातून भेटावे’, असे तीव्रतेने वाटत होते. ते म्हणत होते, ‘‘मला गुरुदेवांकडे जायचे आहे. त्यांना भेटायचे आहे. ते मला कधीच भेटत नाही.’’ तेव्हा कु. पूनमताईला क्षणाचाही विलंब न करता उत्स्फूर्तपणे पुढील कविता सुचली. यातून तिचा प.पू. गुरुदेवांप्रती असलेला उच्च कोटीचा भाव लक्षात येतो. पुर्वी तिनेसाध खरेतर श्री गुरूंचा सर्वांत अधिक सहवास अनुभवला आहे, तरीही ती कधीच त्यांच्या स्थूल रूपात अडकली नाही. ती सर्वत्र श्री गुरूंना पहाते. त्यामुळे ‘ती अन्य साधकांनाही सहजतेने तसे पहायला शिकवते’, असे लक्षात आले.’
– कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
प.पू. गुरुदेव चराचरात व्यापले आहेत ।

न भेटायला
ते कुठे एक आहेत ।
ते तर चराचरात
व्यापले आहेत ॥ १ ॥
जिकडे दृष्टी फिरवाल ।
तिकडे ते आहेत ॥ २ ॥
तुमच्यात, माझ्यात ।
आपल्या प्रत्येकात
ते आहेत ॥ ३ ॥
केवळ सजीवच नाही, ।
तर निर्जीव गोष्टींमध्येही ते आहेत ॥ ४ ॥
प्रत्येकाला त्या भावानेच भेटा ।
म्हणजे त्या भावातच ते आहेत ॥ ५ ॥
त्यांची आठवण काढता ना ।
त्या आठवणीतच ते आहेत ॥ ६ ॥
त्यांच्या दर्शनासाठी
व्याकूळ होता ना ।
त्या व्याकुळतेतच ते आहेत ॥ ७ ॥
म्हणूनच म्हटले..
न भेटायला ते कुठे एक आहेत ।
ते तर चराचरात व्यापले आहेत ॥ ८ ॥
– कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२१)
|
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !