२३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी महाराणा प्रताप यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने…

महाराणा प्रताप यांच्या काळात अकबराने बळ वापरून रजपूत राजांना मांडलिक बनवले. अकबराने मेवाड प्रांत काबीज केला अन् कित्येक रजपूत राजांच्या लेकी-सुनांना स्वतःच्या अंतःपुरात (जनानखान्यात) पत्नी म्हणून ओढले. अशा अत्याचारी अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांनी युद्ध पुकारले. ‘अकबराच्या आज्ञेने राजा मानसिंग आणि अकबरपुत्र सलीम (जहांगीर) महाराणा प्रतापवर चालून गेले. हळदीघाट येथे ही लढाई झाली. यात महाराणा प्रताप यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांनी स्वतःचा घोडा सहस्रो मुसलमान सैनिकांनी वेढलेल्या सलीमच्या हत्तीवर घातला. ‘चेतक’ घोड्याने सलीमच्या हत्तीच्या सोंडेवर झेप घेऊन आपल्या टापा रोवल्या. विजेच्या वेगाने महाराणा प्रतापचा भाला सलीमच्या कंठाजवळून चमकून गेला. दैव बलवत्तर म्हणून सलीम वाचला. ही लढाई अनिर्णित राहिली. यानंतर हिंदुकुलभूषण महाराणा प्रताप यांनी चितोड वगळता उर्वरित मेवाड प्रांत मोगलांपासून मुक्त केला !’
(संदर्भ : स्वा. सावरकर लिखित ग्रंथ ‘सहा सोनेरी पाने’)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?