पुणे – राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध व्यक्त करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. वेळ पडल्यास मिरवणुका रहित कराव्यात; मात्र कार्यक्रम झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्यामुळे सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ अनुमती द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. त्यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जातो. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नेते महाराष्ट्रात, तसेच देशभर फिरत आहेत. मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का ? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने केला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी
नूतन लेख
- Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
- ‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी
- समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा
- महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
- महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…