
पुणे – राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध व्यक्त करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. वेळ पडल्यास मिरवणुका रहित कराव्यात; मात्र कार्यक्रम झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्यामुळे सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ अनुमती द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. त्यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जातो. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नेते महाराष्ट्रात, तसेच देशभर फिरत आहेत. मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का ? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने केला आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.