
सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ डिसेंबरला काही ठिकाणी अचानक पाऊस पडला. सकाळपासूनच वातावरणात पालट जाणवत होता, तसेच उष्णताही वाढली होती. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक पाऊस पडला. वेंगुर्ले, बांदा, सावंतवाडी आणि कणकवली यां शहरांसह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने बर्याच ठिकाणी धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र अचानक आलेल्या पावसाने आता मार्गावर आता चिखल झाला. सध्या थंडी पडत असल्याने आंबा आणि काजू झाडांना चांगला मोहोर आला आहे; मात्र अचानक पडलेल्या पावसाने आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !
दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
आज सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न
सिंहस्थ कुंभपर्वासाठी बोधचिन्ह स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याविषयी सुमित काटे यांचा सत्कार