
गोवा – मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरही चर्चा झाली. बैठकीत अनेक मंत्र्यांनी या प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाचे सूत्र मांडले. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या प्रकल्पांविषयी केंद्राशी समन्वय करून अपेक्षित निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रीमंडळाने मला दिलेले आहेत. याविषयी केंद्राकडे वेळोवेळी समन्वय केला जात आहे. राज्यातील कोळसा वाहतुकीत निम्म्याने घट केली जाणार आहे. मुरगाव बंदरातून कोळशाऐवजी अन्य वस्तूंची वाहतूक करता येऊ शकते का, याविषयी विचारविनियम केला जात आहे. बंदरातील कोळसा वाहतूक एकाच वेळी बंद करता येणार नाही. ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’वर दीड सहस्र कुटुंबे आणि ४ सहस्र ५०० निवृत्तीवेतनधारक अवलंबून आहेत. याविषयी मी ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि केंद्रीय जलवाहतूक मंत्री मंडवीया यांच्याशी चर्चा केली आहे. राज्याला ४०० केव्हीए क्षमतेच्या तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाची आवश्यकता आहे.’’
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !