गायीच्‍या धारोष्‍ण दुधाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

गायीचे दूध काढल्‍यावर ते मुळात थोडे गरम असते. त्‍यामुळे त्‍याला ‘धारोष्‍ण’ म्‍हणतात.

वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार आचरण करून आरोग्य कसे सांभाळावे ?

‘सध्या वातावरणातील थंडी अल्प होऊन दुपारनंतर गरम होण्यास आरंभ झाला आहे. जेव्हा गरम होते तेव्हा काही जण गार पाणी, सरबते, आईस्क्रीम, ऊसाचा रस, फळे आणि त्यांचे रस इत्यादी थंड पदार्थ घेतांना आढळतात; परंतु अजून थंडी पूर्णतः गेलेली नाही.

वारंवार सर्दी, खोकला किंवा शिंका यांचा त्रास होण्‍यामागील दैनंदिन दुर्लक्षित कारण कोणते ?

सध्‍या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. असे होण्यामागे एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्‍हणजे सध्‍या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्‍यावरुन अंघोळ) करणे’.

शिळे अन्‍न खाणे का आणि कसे टाळावे ?

मध्‍यम मार्ग म्‍हणजे दुसर्‍या दिवशी पोळ्‍या करण्‍यासाठीची पूर्वसिद्धता म्‍हणून तत्‍पूर्वी रात्री पीठ, मीठ आणि तेल आवश्‍यकतेनुसार मोजून एकत्र करून ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्‍या मिश्रणात केवळ पाणी घालून कणिक भिजवावी आणि त्‍याच्‍या पोळ्‍या कराव्‍यात.

वैद्यांनी सखोल आयुर्वेदाध्‍ययन करून ‘सुपरस्‍पेशालिटी’ (विशेष तज्ञ) वैद्य बनणे, ही काळाची आवश्‍यकता !

प्रत्‍येक वैद्याने कोणत्‍याही एका आवडीच्‍या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्‍या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्‍ययन करावे. त्‍या विषयातील ‘सुपरस्‍पेशालिस्‍ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्‍वतः आत्‍मविश्‍वासाने आयुर्वेदानुसार त्‍या रोगाची चिकित्‍सा करावी.

दही खायचे आहे; पण त्‍याचा त्रास न होण्‍यासाठी काय करावे ?

असे अनेक पदार्थ आपण युक्तीने खाऊन त्यांचे चांगले परिणाम मिळवू शकतो, तसेच त्यांच्यावर कांही संस्कार (त्यांच्या गुणांमध्ये अपेक्षित पालट) करून त्यांचे दुष्परिणाम टाळू शकतो !

‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाण्‍याचे दुष्‍परिणाम !

‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाल्‍ल्‍याने अनेक शारीरिक विकार अन् चिडचिड असे मानसिक विकार होतात. यामुळे ‘असे चायनीज पदार्थ खाऊन आरोग्‍याची हेळसांड करायची ? कि घरचे सात्त्विक अन्‍न खाऊन निरोगी रहायचे ?’, हे प्रत्‍येकाने आपल्‍या सदसद्विवेकबुद्धीने ठरवावे !’

त्‍वचेच्‍या बुरशी संसर्गाचे (‘फंगल इन्‍फेशन’चे) दुर्लक्षित कारण जाणून त्‍याच्‍या दुष्‍टचक्रातून बाहेर पडा !

एकदा बुरशी संसर्ग झाला की, रुग्‍णाच्‍या त्‍वचेचे आरोग्‍य बिघडते. यासाठी रुग्‍णाला बरीच बुरशी संसर्ग प्रतिरोधक (अँटी फंगल) औषधे पोटात घेण्‍यास, तसेच त्‍वचेवर लावण्‍यास दिली जातात.

तळपायांना तेल लावा आणि तणावमुक्‍त व्‍हा !

पाद (पाय) हे कर्मेंद्रिय असून त्‍यांमध्‍ये श्रीविष्‍णूंचे अधिष्‍ठान असते. त्‍यामुळे पाय स्‍वच्‍छ धुवून ते पुसावेत आणि मग त्‍यांना तेल लावावे. यामुळे शरीर, मन, इंद्रिये आणि बुद्धी यांची निर्णयक्षमता वाढून अनेक चांगले परिणाम साधले जातात अन् स्‍वतःची कार्यक्षमता वाढते.

पू. वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाची वार्ता समजल्यावर काही वैद्यांनी सामाजिक माध्यमांमध्ये उत्स्फूर्तपणे केलेले लिखाण

कठीण शारीरिक स्थितीतही साधकांसाठी अहोरात्र झटणारे पू. वैद्य भावेकाका !