

‘रात्री झोपतांना तळपायांना कोमट खोबरेल तेल लावून ते जिरवावे. यामुळे रात्रीची झोप अपूर्ण होणे आणि सकाळी आपोआप जाग न येणे, अशा समस्यांमुळे डोळे अन् मेंदू यांवरील ताण अल्प होतो, तसेच मानसिक स्वास्थ्य लाभून झोप शांत लागण्यास साहाय्य होते. तळपायांना तेल लावल्यास ते डोळ्यांसाठी पोषक ठरते. खरे तर पाय आणि पाठ हे शरिरातील दुर्लक्षित भाग असतात; परंतु तळपायांना तेल लावण्याच्या निमित्ताने पावलांची निगा राखली जाते.
पाद (पाय) हे कर्मेंद्रिय असून त्यांमध्ये श्रीविष्णूंचे अधिष्ठान असते. त्यामुळे पाय स्वच्छ धुवून ते पुसावेत आणि मग त्यांना तेल लावावे. यामुळे शरीर, मन, इंद्रिये आणि बुद्धी यांची निर्णयक्षमता वाढून अनेक चांगले परिणाम साधले जातात अन् स्वतःची कार्यक्षमता वाढते. हे सर्व लाभ अनुभवण्यासाठी रात्री झोपतांना तळपायांना तेल लावावे.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (८.१२.२०२२)
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
Nipah Outbreak : केरळमध्ये या वर्षी ‘निपाह’ विषाणूचा पहिला रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर !