समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या महाग प्रकल्पाचा फेरविचार करावा – आशिष शेलार

निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारण्याचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत; मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तियाला अटक

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी धाडी टाकल्या.

मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका ! – प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीचे आयुक्तांना निवेदन

प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप

६० वा गोवा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपयांच्या साहाय्याची मागणी !

गोवा राज्य ६० वा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० पासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे गोवा आणि देशभर गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन सर्वांना घडवले जाणार आहे.

कळंबणी बु. (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री भैरी चाळकोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि दानपेटीतील रकमेची चोरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! हिंदूंच्या धार्मिक स्थानांच्या संदर्भात अशा घटना सातत्याने घडणे, हे हिंदूबहुल भारतासाठी लाजिरवाणे !

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला होत असलेल्या विरोधाविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना माहिती देण्यात आली आहे

म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हादई जलतंटा लवादाने म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी निवाडा यापूर्वी दिला आहे.

आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर अल्प झाले !

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्यांनी अल्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी !

अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे.