सद्गुरूंचे संतांनी वर्णिलेले महत्त्व

‘आपल्या देशात सर्वाधिक आदर आणि सन्मान गुरूंना मिळतो आणि आपली अशी श्रद्धा रहाते की, गुरु साक्षात् ईश्वरच आहेत. तितकी श्रद्धा आपल्याला आपल्या आई-वडिलांप्रतीही नसते. आई-वडील तर आपल्याला केवळ जन्म देतात; परंतु गुरु तर आपल्याला मुक्तिमार्ग दाखवतात.’

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे योगी आहेत. त्यांच्या मुखातून योग्य वेळी ‘हिंदूंनी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’ याविषयी मार्गदर्शन येईल.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.

गुरूंचे माहात्‍म्‍य

‘गुरुभक्‍तीयोगात येते की, सुईच्‍या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्‍यंत कठीण गोष्‍ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्‍वरी कृपा प्राप्‍त करणे.’

…ते लोक स्‍वतःशीच धोका करतात !

ईश्‍वराच्‍या मार्गावर चालणार्‍यांना जे भोगांमध्‍ये पाडतात, संसारात आकर्षित करतात, ते लोक पुष्‍कळ पाप कमवतात. जे लोक भोग वासनेचे संकल्‍प करतात, भोगाच्‍या तृप्‍तीची इच्‍छा करतात आणि ईश्‍वराच्‍या मार्गावर चालणार्‍यांकडून संसाराचा स्‍वार्थ साधू पहातात, ते लोक स्‍वतःशीच धोका करतात.

साधनेचे महत्त्व

आपल्‍या हृदयात धर्म स्‍थापन झाला आहे कि नाही ? धर्म स्‍थापन होईल, तेव्‍हा वैराग्‍य जागृत होईल. धर्माचा रंग जितका गडद (पक्‍का) होईल, तितकीच वैराग्‍याची खुमारी अधिक राहील आणि जितके पापाचरण होईल

शास्‍त्रानुकूल आचरणाचे फळ कोणते ?

‘शास्‍त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्‍ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्‍य येईल. सत्‍संगाचे, शास्‍त्र अध्‍यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्‍य येत नसेल, तर तुम्‍ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्‍त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.

सुभाषिते

केवळ दुसर्‍यांचे कल्‍याण करण्‍याच्‍या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते. तुमच्‍यात जी योग्‍यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्‍या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्‍यामुळे तुम्‍ही सुयोग्‍य बनाल…..