‘देवाचा कधीही विसर पडू नये’, असा वर मागणारे जगद्गुरु संत तुकाराम !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’
मुलगी कान-नाक टोचून घेण्याचे दुःख भोगण्यास का सिद्ध होते ? तिला अलंकार घालण्याचे सुख मिळावे म्हणून. मातेला प्रसूतीवेदना भोगल्यानंतरच मातृत्वाचा आनंद भोगता येतो. तसेच गर्भवासाचे दुःख उपभोगल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि मगच सत्संग घडू शकतो. यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘(तुझा विसर पडणार नसेल, तर) आम्हाला खुशाल पुन्हा गर्भवास (जन्म) दे.’
(सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !