देवाकडे व्‍यवहारातील काही मागू नका, उलट त्‍याला शक्‍य तितके अर्पण करा !

देवाने आपल्‍याला दिलेले तन, मन आणि धन यांतील शक्‍य तितका भाग आपण देवाला अर्पण केला, म्‍हणजे शरिराने सेवा, मनाने नामजप आणि धनाचा त्‍याग केला, तर त्‍यातून आपली पाप-पुण्‍याच्‍या पलीकडील साधना होते.

आसक्‍तीमुळे खरे ज्ञान होत नाही !

‘ज्‍याच्‍यात आसक्‍ती किंवा द्वेष असतो, तो सत्‍याचे निरूपण करू शकत नाही; कारण ती आसक्‍ती त्‍याच्‍या ज्ञानाशी जुळून जाते. अशा स्‍थितीत तो स्‍वतःविषयी किंवा दुसर्‍याविषयी योग्‍य निर्णय घेऊ शकत नाही.

सद़्‍गुरूंमुळेच आपल्‍या आत्‍म्‍याला परमात्‍म्‍यात तदाकार करण्‍याचा प्रसाद मिळणे !

‘संत कबीर यांनी म्‍हटले आहे की, अशा संतांचे वा सद़्‍गुरूंचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्‍य करावे.’

सद़्‍गुरुरूपी परिसाचा स्‍पर्श करवून दिला

हे बंधू ! लोखंडाला लागलेल्‍या गंजासमान पापी जीव सोन्‍यासमान शुद्ध झाले आहेत; कारण भगवंताने त्‍यांना सद़्‍गुरुरूपी परिसाचा स्‍पर्श करवून दिला आहे (सद़्‍गुरूंची भेट घालून दिली आहे).

परमात्‍माप्राप्‍तीसाठी करायच्‍या आवश्‍यक कृती

आपले कर्म, आपले बोलणे आणि आपले व्‍यवहार यांत तुम्‍ही उद्देश आणि आश्रय ईश्‍वराचा ठेवला, तर तुमचे जीवन सत्-चित्-आनंद स्‍वरूप परमात्‍म्‍याशी भेट घालून देणारे होईल.

जग भ्रमाने वेडे झाले आहे !

लोक मथुरा, काशी आणि द्वारका या यात्रा करत आहेत. ६८ तीर्थांमध्‍ये स्नान करत आहेत; परंतु सद़्‍गुरूंविना कोणताही मनुष्‍य आत्‍मा-परमात्‍म्‍याचा शोध घेऊ शकला नाही, उलट वारंवार भवसागरात गटांगळ्‍या खात आहे.

विश्‍वंभर कुठे प्रगट होतात ?

भलेही हा देह सुटो; पण गुरुचरणी माझा भाव दृढ राहील. माझ्‍यावर शिळा येऊन कोसळल्‍या, तरीही मी गुरुचरण कधीच सोडणार नाही. (संत एकनाथ महाराज म्‍हणतात की, ज्‍याच्‍या हृदयात सद़्‍गुरूंप्रती अशी दृढ निष्‍ठा, माधुर्य आहे, तेथेच विश्‍वंभर प्रगट होतात.’

निष्‍काम कर्माने गुरुवचन तुमच्‍या हृदयात शिरेल !

‘वैदिक विधानाने केलेल्‍या उचित निष्‍काम कर्माने बुद्धीचा मळ दूर होतो. तो दूर झाल्‍यावर आत्‍मजिज्ञासा उत्‍पन्‍न होते आणि सद़्‍गुरूंच्‍या मुखातून ऐकलेल्‍या शास्‍त्राचा अर्थ मनुष्‍याच्‍या हृदयात असा शिरतो, जसे आरशात प्रतिबिंब शिरते.’

सद्गुरूंचे संतांनी वर्णिलेले महत्त्व

‘आपल्या देशात सर्वाधिक आदर आणि सन्मान गुरूंना मिळतो आणि आपली अशी श्रद्धा रहाते की, गुरु साक्षात् ईश्वरच आहेत. तितकी श्रद्धा आपल्याला आपल्या आई-वडिलांप्रतीही नसते. आई-वडील तर आपल्याला केवळ जन्म देतात; परंतु गुरु तर आपल्याला मुक्तिमार्ग दाखवतात.’

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे योगी आहेत. त्यांच्या मुखातून योग्य वेळी ‘हिंदूंनी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’ याविषयी मार्गदर्शन येईल.