आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग
‘आत्मविद्या मिळवण्यासाठी जितकी तळमळ असेल, तितके तुमचे शरीर संयमी होईल. त्यामुळे मनाचे संसाराप्रती असणारे आकर्षण न्यून होईल. संसाराचे आकर्षण जितके न्यून होईल, तितके तुमचे मन प्रसन्न राहील.
‘आत्मविद्या मिळवण्यासाठी जितकी तळमळ असेल, तितके तुमचे शरीर संयमी होईल. त्यामुळे मनाचे संसाराप्रती असणारे आकर्षण न्यून होईल. संसाराचे आकर्षण जितके न्यून होईल, तितके तुमचे मन प्रसन्न राहील.
पांडवांच्या पक्षात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपला संकल्प मोडला. युद्धापूर्वी ते म्हणाले होते, ‘मी शस्त्र उचलणार नाही.’ तथापि भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, ‘माझे वचन मोडले, तरी चालेल; परंतु हे धर्मयुद्ध जिंकले पाहिजे.’ यासाठीच भगवान श्रीकृष्ण यांनी रथाचे चाक हातात घेतले.
स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.
‘गुरुपौर्णिमा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात साजरी केली जात होती; परंतु काळाचे असे कुचक्र फिरले की, अन्य देश या गुरुपौर्णिमेचे ज्ञान आणि गुरुपरंपरेचे अमृत पिणे-पाजणे विसरून गेले; परंतु भारताने अजूनही ही परंपरा जपून ठेवली आहे.
‘त्या एका ब्रह्माचे रहस्य सामान्य मनुष्य समजू शकणार नाही. त्याने ते समजावे, या दृष्टीने विस्तारपूर्वक कथा, गुरु-इतिहास, दृष्टांत वगैरे देऊन जे त्याच्या चित्ताला परब्रह्म-परमात्म्याच्या ज्ञानाकडे घेऊन जातात
सज्जन पुरुष नारळासारखे दिसतात, अर्थात् वरून कठोर आणि आतून कोमल (मृदू) अन् गोड ! दुर्जन लोक बोरासारखे फक्त बाहेरूनच मनोहर असतात. (आतून कठोर हृदयाचे असतात.)
‘आज समाज दुःखी, नीरस जीवन जगत आहे. जर समाजाला खरे सुख-शांती, आनंद पाहिजे असेल, तर सत्संग-आयोजनांची आज अत्यंत आवश्यकता आहे.’
‘बलवान तोच उत्तम आहे, जो निर्बलांची, असाहाय्यांचे साहाय्य करण्यात शूर असेल, ज्याच्यापासून आळस आणि भय सर्वथा दूर असेल, संयम ज्याच्या समवेत असेल आणि इंद्रियरूपी घोड्यांचा मनरूपी लगाम ज्याच्या हातात असेल; यासह जो बुद्धीमान आणि निरभिमानी असेल.