ईश्‍वराला पहाण्याचा दिवस हाच खरा वाढदिवस करण्याचा दिवस !

‘स्वामी रामतीर्थ रडत असत, ‘अरे ! २१ वर्षे होऊन गेली. २१ वा वाढदिवस आहे, ही गोष्ट खोटी आहे, २१ वर्षे मी मेलो आहे. प्रतिदिन मरता-मरता आज २१ वर्षे होऊन गेली. जेव्हा आपल्या जीवात्म्याला परमात्म्याच्या रूपात प्रगट पाहीन, तेव्हा माझा खरा जन्म होईल.’

संत दर्शन

‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, संतांचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवाड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’                           

भक्‍तासाठी ईश्‍वरच एकमेव शाश्‍वत स्‍थान

ईश्‍वराच्‍या अनन्‍य भक्‍तासाठीही ईश्‍वरच एकमेव स्‍थान आहे, जेथे त्‍याला शुद्ध सुख, विश्रांती मिळते.

केनोपनिषद

‘वेदांचा अंतिम भाग म्‍हणजे उपनिषदे ! अंतिमचा अर्थ शेवटचा, असा नव्‍हे. अंतिम म्‍हणजे Ultimate किंवा सर्वोत्तम. वेदांमध्‍ये स्‍थूलपणे (अंदाजे) ९६ टक्‍के भाग कर्मकांडाचा आहे.

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात.

साधनेत अडथळा आणणार्‍या गोष्टींचा त्याग करा !

‘जी गोष्ट ऐकल्याने तुमची भक्ती, साधना, तुमचा सुसंग (चांगला संग), तुमची श्रद्धा आणि तुमचा भगवत्मार्ग डगमगतो, त्या गोष्टी विषासमान असून त्यांचा त्याग करा.’

सप्तलोकांचे अर्थ

सनातन धर्मात ‘सप्तलोक’ सांगितले आहेत. देवाच्या कृपेने मला सूक्ष्म ज्ञानाद्वारे त्यांचे अर्थ प्राप्त झाले. ते पुढे दिले आहेत.

विजेरीचा प्रकाश आणि अध्यात्मातील उन्नतांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश यांतील भेद !

विजेरीचा प्रकाश अंधाराच्या दिशेने सोडल्यास काही अंतरापर्यंत तो स्पष्ट दिसतो; पण अंतर वाढवत गेल्यास प्रकाश अस्पष्ट होत जातो. याउलट अध्यात्मातील उन्नतांच्या हाताच्या बोटांतून बाहेर पडणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश जवळच्या अंधारापेक्षा दूरच्या अंधारात आणखी स्पष्ट दिसतो.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन !

‘अन्न ही ब्रह्मरूपी चेतना आहे. अन्न ग्रहण करतांना आपल्यातील चेतना अन्नातील चेतनेला ग्रहण करत असते. हे एक प्रकारे आत्म्याचे भोजन किंवा चेतनेचा संयोग असतो.

सुख-शांती कशात आहे ?

अरे माझ्या दुष्ट मना ! तू निराशेची प्रतिमा (मूर्ती) आहेस, जे काही भगवंताने तुला दिले आहे, त्यासाठी तू त्याचे आभार मान, इच्छा कधी कुणाच्याच पूर्ण झाल्या नाहीत. सुख-शांती तर संतोषात (समाधानात) आहे.