भाजपचे ५, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ अन् काँग्रेसचा १ उमेदवार विजयी !

राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत ५ उमेदवार निवडून आणले, तर शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले आहेत.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदारांसह बंड !

शिवसेनेत किंमत दिली जात नसल्याच्या कारणावरून अप्रसन्न असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा ! – नाना पटोले

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. १८ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानासाठीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

भाजपच्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता बंद आंदोलन !

नुपूर शर्मा यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

धर्म : गोळी कि चैतन्याचे बीज ?

‘धर्म अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज ?’, हे येत्या काळात संपूर्ण विश्वाला लक्षात येईल !

(म्हणे), ‘धर्माची गोळी दिली की, लोक झोपून रहातात हे त्यांना ठाऊक आहे !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आजपर्यंत केवळ धर्म-जात यांच्या आधारावरच राजकारण केले. नेहमीच अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे काम केले. आता हिंदू जागृत होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने जितेंद्र आव्हाड सारख्यांना पोटशूळ होऊन ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे जनता ओळखून आहे !

(म्हणे) ‘हिंदु महासंघाची शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ‘ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे, त्याच दुकानातून वस्तू खरेदी करू’, अशी शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘हिंदु महासंघाची ही शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद आहे.’’

दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा अंगरक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीत माहिती आली समोर

(म्हणे) ‘वाराणसीमधील मंदिर जेवढे जुने तेवढीच ज्ञानवापी मशीदही जुनी !’

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. भविष्यात न्यायालयातही हे सिद्ध होईल; तरीही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणारे हे सत्य पवार का नाकारत आहेत, हे हिंदू जाणून आहेत !