
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी हे मतदान केले नाही, तर ते त्यांच्या कर्तव्यापासून वंचित रहातील. त्यातून जनतेच्या मताचाही अनादर होईल, असा युक्तीवाद देशमुख आणि मलिक यांच्या अधिवक्त्यांनी केला.
या वेळी अंमलबजावणी संचालनालयाचे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत बंदीवानांना मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
सातारा येथील महिमानगड होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’ !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !