बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
धर्मांध मुसलमानांनी १७ मेच्या रात्री बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील महादेवपूर उपजिल्ह्यात असलेल्या नोहाटा मोर, सरकार पारा येथील काली मंदिराला आग लावली
धर्मांध मुसलमानांनी १७ मेच्या रात्री बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील महादेवपूर उपजिल्ह्यात असलेल्या नोहाटा मोर, सरकार पारा येथील काली मंदिराला आग लावली
चिखली (बुलढाणा) येथे एका विवाहाच्या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे लावलेले गाणे धर्मांधांनी थांबवण्यास सांगत वरातीवर दगडफेक केली.
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.
जैसलमेर (राजस्थान) येथील अमर सागर भागात पाकिस्तानी निर्वासित हिंदु कुटुंबांची ५० घरे प्रशासनाने बुलडोझरद्वारे पाडली. हे पाकिस्तानी निर्वासित हिंदू बर्याच काळापासून येथे रहात होते.
आम्ही राज्यात चित्रपटावर बंदी आणलेली नाही. चित्रपटगृहाच्या मालकांनीच प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपट हटवला आहे, असे प्रतिज्ञापत्र तमिळनाडूतील द्रमुक सरकारने ‘द केरल स्टोरी’विषयी सर्वाेच्च न्यायालयात सादर केले.
कर्नाटकमध्ये मुसलमानांनी काँग्रेसला मतदान केल्याने तिचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने या बदल्यात मुसलमानाला उपमुख्यमंत्री करावे आणि ५ मंत्रीपदे द्यावीत, अशी मागणी राज्याच्या वक्फ बोर्डाने केली आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या विजयानंतर ‘आर्.पी.डी. क्रॉस’जवळ जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. मुसलमानांना आरक्षण आणि बजरंग दलावर बंदी, या आश्वासनांमुळे काँग्रेसचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे मशिदीतील नमाजपठणानंतर काही धर्मांधांनी घोषणाबाजी करत श्रीराम चित्रपटगृह आणि तेथील महिला प्रेक्षक यांच्यावर दगडफेक केली. घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांच्यावरही आक्रमण केले.
जालना शहरात मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.