‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?
‘अग्नीपथ’ योजनेसाठी पूर्वीची साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा आता २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ४ ते ५ सहस्र जागा येऊ शकतात. पुढील ३ मासांत भरती प्रक्रिया चालू होणार आहे.