यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्यांचा नकार !
कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली.