यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्‍यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्‍यांचा नकार !

कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्‍यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्‍याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ सहस्र ३७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीची हानी

१७२ गावांमधील १ सहस्र ५९ शेतकर्‍यांच्या एकूण ३ सहस्र ३७५.१६ हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हानी झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे.

बोगस बियाणांची समस्या मुळापासून सोडवा !

प्रतिवर्षी अस्मानी संकटामुळे पिके नेस्तनाबूत होतात. यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांचा अपलाभ घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बनावट बियाणे विकले जाते. खरीप हंगामाला आरंभ होण्यापूर्वीच अशा घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकर्‍यांची प्रचंड हानी होते.

यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन !

खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा ………

यवतमाळ येथे बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसंदर्भातील तक्रारींच्या निवारणार्थ नियंत्रण कक्ष कार्यान्वित !

 बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, बियाणे आस्थापनांचे प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारी यांचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरण राबवतांना अनुदानित शाळांचे व्यवस्थापन सरकार कह्यात घेणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. धोरण राबवतांना पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक स्तरावर ‘फाऊंडेशन कोर्सेस’ प्रारंभ करण्यात येणार आहेत….

कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचे आज भारत बंद आंदोलन

गेल्या ४ मासांपासून देहलीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी उद्या २६ मार्च या दिवशी भारत बंदचे आयोजन केले आहे. त्यांच्या आंदोलनाला १२० दिवस झाल्याच्या निमित्ताने हा बंद आयोजित करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांचे खच्चीकरण थांबवा !

१० मार्च या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महावितरणने पुन्हा थकित वीजदेयकांची धडक वसुली मोहीम चालू केली आहे. या मोहिमेचा फटका वीजदेयके थकवणार्‍या शेतकर्‍यांनाच नव्हे, तर नियमित वीजदेयके भरणार्‍या शेतकर्‍यांनाही बसत आहे.

चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे ! – भारताने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सुनावले

ब्रिटिशांना भारतातून हाकलले; मात्र भारतावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी त्यांच्यात अजूनही दिसून येते. ब्रिटनला समजेल, अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे !

शेतकर्‍यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज आणि महिलांसाठी ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.