कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचे आज भारत बंद आंदोलन

नवी देहली – गेल्या ४ मासांपासून देहलीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी उद्या २६ मार्च या दिवशी भारत बंदचे आयोजन केले आहे. त्यांच्या आंदोलनाला १२० दिवस झाल्याच्या निमित्ताने हा बंद आयोजित करण्यात आला आहे.

याला काँग्रेस, साम्यवादी पक्ष आणि अन्य विरोधी पक्ष यांनी समर्थन दिले आहे. हा बंद सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत असणार आहे.