ब्रिटनच्या संसदेत भारतातील कृषी कायद्यावरून चर्चा
|

नवी देहली – भारताच्या कृषी धोरणांवर ब्रिटीश संसदेत चर्चा होणे हा लोकशाही असलेल्या अन्य देशातील राजकीय क्षेत्रातील हस्तक्षेप आहे. चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे, असा सल्ला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांना दिला आहे.
#India summons #British envoy over debate on #farmlaws, advises UK MPs to refrain from vote bank politics, reports Sidhant Sibal (@sidhant )#FarmBills #FarmersProtests https://t.co/JffBne1NJw
— DNA (@dna) March 9, 2021

ब्रिटीश संसदेत भारतातील कृषी सुधारणांविषयी चर्चा करण्यास आली. त्याविषयी भारताने ब्रिटीश उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे याविषयी तीव्र आक्षेप नोंदवला. ‘संतुलित चर्चा होण्याऐवजी वस्तूस्थिती जाणून न घेताच अयोग्य पद्धतीने चर्चा करण्यात आली’, असे सांगत भारताने अप्रसन्नता व्यक्त केली. एकतर्फी चर्चा केल्याचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने निषेध केला आहे. ब्रिटनमधील खासदारांच्या एका गटाने ही चर्चा घडवून आणली होती.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे