गांजाची लागवड ही केवळ औषधनिर्मिती आस्थापनांशी निगडित ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

गोव्यात वादग्रस्त ठरलेली गांजाची लागवड ही केवळ औषधनिर्मिती आस्थापनांशी निगडित होती आणि ही लागवड टाळेबंद स्थितीत करण्यात येणार होती. विरोधी पक्षांनी याविषयी राजकारण केले, असे प्रतिपादन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे.

म्हापसा शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला पदपथ बांधण्याविषयी गोवा उच्च न्यायालयाची नोटीस

म्हापसा शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला पदपथ बांधण्याविषयी उच्च न्यायालयाने म्हापसा नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर संबंधित यांना नोटीस दिली आहे. गोवा फाऊंडेशन या संस्थेने याविषयीची याचिका उच्च न्यायालयात सादर केली होती.

ऊस उत्पादकांना पुढील आठवड्यात हानीभरपाई देणार ! – खासदार नरेंद्र सावईकर

निर्धारित मुदतीत शासनाने ऊस उत्पादकांना कोणतेही सहकार्य न केल्याने ऊस उत्पादक संघटनेच्या झेंड्याखाली सर्व ऊस उत्पादक सांगे येथे २ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणार आहेत.

वीज खाते दीड लाख थकबाकीदारांच्या विरोधात कृती करणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

एवढ्या जणांची थकबाकी राहीपर्यंत वीजखाते काय करत होते ? संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी !

बेरोजगारांच्या कर्जविषयक समस्या सुटण्यासाठी ‘प्रतिसाद कक्ष’ स्थापन करण्याची मागणी

कोरोना महामारी आणि त्यानंतरची दळणवळण बंदी यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अगोदरच आर्थिक संकटांशी सामना करत असून कोरोनामुळे आता रोजगाराची स्थिती अधिक गंभीर आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहितेची कार्यवाही व्हावी

अशी मागणी का करावी लागते ? सरकारी आदेशांची कार्यवाही प्रशासन स्वतःहूनच का करत नाही ?

गावागावांत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाकडून ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण

‘महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन’च्या अंतर्गत ‘फिल्ड किट’द्वारे (FTK) पाण्याची गुणवत्ता तपासण्याविषयी ‘जलजीवन मिशन’द्वारे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ५ महिलांना जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्यात आले आहे.

युवा शेतकरी श्याम गावकर यांच्या कष्टाने साट्रे (तालुका सत्तरी) येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन यशस्वी

सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामीण तालुका ! काजू, सुपारी, नारळ, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उत्पादनांमध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडली आहे. सत्तरीतील युवा प्रगतशील शेतकरी श्याम गावकर यांनी म्हादई अभयारण्यातील साट्रे गावात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.

वुहानचे वास्तव !

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अन्य देशांतील आकडे लाखांच्या घरात जात असतांना चीनमध्ये केवळ काही सहस्र नागरिकांचीच माहिती होती. याचे कारण आता लक्षात येत आहे की, ज्यांनी ही माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची चीनने मुस्कटदाबी केली, त्यांचा छळ केला.

प.पू. गुरुदेवांप्रती भाव असलेल्या राजापूर येथील सौ. स्मिता प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सौ. स्मिता प्रभुदेसाईकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकताच सर्व साधकांनी मनोमन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.