नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे.