नाशिक येथील ३ हत्यांच्या घटनांच्या निषेधार्थ सातपूर पोलीस ठाण्यासमोर भाजप पदाधिकार्‍यांचे ठिय्या आंदोलन !

युनियनच्या वादातील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून जिल्ह्यातील सातपूर येथे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची नुकतीच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.

नाशिक पोलिसांवर राजकीय दबाव असून विधिमंडळात आवाज उठवणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. त्यांनी मृत अमोल इघे यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे हडपसर (पुणे) येथे उत्साहात स्वागत !

‘श्री हरि विठ्ठल’ नामघोषात पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. या पालखीसमवेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

विभक्त पत्नीला तातडीने देखभाल खर्च देण्याचा पोलीस आयुक्तांना आदेश !

विभक्त झालेल्या पत्नीच्या देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना दिले आहेत.

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (जिल्हा पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमीला त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.

पुढील पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची मागणी !

नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणे अपेक्षित आहे. यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आहे…

ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांच्या जन्मघराची डागडुजी तातडीने करावी !

हिंदु जनजागृती समितीची रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढणार्‍या रुग्ण संख्येमुळे पुन्हा निर्बंध लागू !

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’मुळे केंद्र सरकारने याविषयी देशातील सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणार्‍या प्रवाशांविषयी विशेष दक्षता घ्यावी, असे केंद्राने कळवले आहे.

धाराशिव आगारात संपकरी आणि एस्.टी. कर्मचारी यांच्यातील वादामुळे कर्तव्यावरील कर्मचारी बेशुद्ध !

ऐन दिवाळीत चालू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपानंतर सरकारच्या आवाहनामुळे काही कर्मचारी कामावर आले; मात्र आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नाही.