गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाची तुलना जुगाराच्या अड्डयाशी करणार्‍या अधिवक्त्यावर कारवाई

गुजरात उच्च न्यायालयाने येथील अधिवक्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता यतिन ओझा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी कारवाई करत त्यांची ज्येष्ठता रहित केली.

मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाच्या विनाशाला प्रारंभ होईल ! – मध्यप्रदेशचे हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा

५ ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर कोरोनाचा विनाश होण्यास प्रारंभ होईल, असे विधान मध्यप्रदेशातील हंगामी सभापती रामेश्‍वर शर्मा यांनी केले.

भगवान कार्तिकेय यांच्या भजनाचा अवमान करणार्‍या यू ट्यूब वाहिनीवर केलेल्या कारवाईसाठी अभिनेते रजनीकांत यांच्याकडून तमिळनाडू सरकारचे कौतुक

अभिनेते रजनीकांत यांनी भगवान कार्तिकेय (मुरुगन) यांच्या भजनाचा अवमान करणार्‍या ‘करूप्पर कूटम्’ या यू ट्यूब वाहिनीच्या विरोधात तमिळनाडू सरकारने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ येथे वीज कोसळून ८० फूट लांब भिंत कोसळली

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले.

कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू

एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !

इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षेत सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या विद्यार्थ्यांचे सुयश

परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. अमिषा म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना मी नियमित अत्तर-कापूर लावते. यामुळे अभ्यासात एकाग्रता येत होती. अभ्यासाचा ताण किंवा झोप येत नसे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !

पोलिसांना ठार केल्यावर त्यांचे मृतदेह जाळणार होतो ! – विकास दुबे याची स्वीकृती

पोलीस धाड घालणार असल्याची माहिती पोलिसांकडूनच मिळाली होती !