‘ई-पॉस मशिन’ सातत्याने बंद पडत असल्याने १० सहस्र मेट्रिक टन धान्य गोदामात पडून !

प्रशासन याविषयी काही उपाययोजना काढणार नाही का ? धान्य खराब झाल्यास त्यास कुणाला उत्तरदायी धरायचे ?

मविआ सरकार आणि मुंबई महापालिका यांचा ५०० कोटी रुपयांचा ‘महाकाली गुंफा’ घोटाळा ! – किरीट सोमैया, भाजप

अंधेरी येथील ‘महाकाली गुंफा’ परिसरातील विकासाच्या कामात शिवसेनेचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात खासदार संजय राऊत कारागृहात आहेत

जालना येथील मंठा अर्बन को-ऑप. बँकेतील १२ कोटी १८ लाखांचा अपहार प्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद !

जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याविषयी अनुमतीही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या शिफारसीने लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते.

वाकड येथील कृत्रिम हौदात विसर्जित २ सहस्रांहून अधिक श्रींच्या मूर्तींचे संकलन

धर्मद्रोहाची परिसीमा गाठत हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्याचा घाट ! केवळ हिंदु धर्माला विरोध आणि गणेशभक्तांचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून चौकशी समिती

मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महापालिकेकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती १ मासात अहवाल सादर करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात १ रुपयांचा अब्रुहानीचा दावा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्‍याकडून प्रविष्ट !

अशा प्रकारे अंतर्गत वादातून एकमेकांचे कट्टर विरोधक कार्यकर्ते असणारे पक्ष जनहित कधीतरी साधू शकतील काय ?

कोल्हापूर-कलबुर्गी नवी रेल्वे धावण्यास सज्ज !

कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट, तसेच सध्याच्या फलाट विस्तारीकरणाच्या कामाची त्यांनी पहाणी केली. या वेळी पुणे विभागाचे मुख्य परिचलन व्यवस्थापक स्वप्नील नीला, स्थानक प्रबंधक विजय कुमार, करण हुजगे, रवींद्र कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.

अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पीडितत शेतकर्‍यांसाठी वाढीव दराने ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य !

अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे एकूण २३ लाख ८१ सहस्र ९२० हेक्टर शेतीची हानी झाली असून २५ लाख ९३ सहस्र शेतकर्‍यांना अतीवृष्टीचा फटका बसला आहे. या पीडित शेतकर्‍यांसाठी ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य करण्यात येणार आहे.

‘ऋग्वेद मांसाहार करण्याची अनुमती देतो’, असे म्हणणारा जम्मूमधील मुसलमान अधिकारी निलंबित

 हिंदूंच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे, यापेक्षा या अधिकार्‍याने त्याच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे आणि ते प्रत्यक्षात काय करत आहेत, याविषयी बोलायला हवे !

उपोषण आणि दांडी यात्रा यांद्वारे नव्हे, तर नेताजी आणि सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘केवळ उपोषण आणि दांडी यात्रा करून आपण स्वातंत्र्य मिळवले’, हेच बिंबवण्यात आले; प्रत्यक्षात तसे नाही, असे मत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले आहे.