‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील यांचे निधन !

मुंबई – नामांकित ‘केसरी टूर्स’चे संस्थापक आणि अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने १५ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांना पर्यटन क्षेत्रातील ‘चालते बोलते विद्यापीठ’ म्हणून संबोधले जायचे. राजकीय, सामाजिक, पर्यटन आदी विविध क्षेत्रांतील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. ‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतून त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली होती आणि पुढे पर्यटन व्यवसायात हे आस्थापन अव्वल दर्जाचे म्हणून ओळखले गेले.