बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ १६ ऑगस्टला इचलकरंजी (कोल्हापूर) बंद !

प्रतिकात्मक चित्र

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ, देशातील हिंदूविरोधी कारवाया, तसेच भारताच्या विरोधात विद्रोह घडवण्याचे काम करणार्‍या व्यक्ती-संघटना यांच्या विरोधात ‘सकल हिंदु समाज इचलकरंजी’ यांच्या वतीने १६ ऑगस्ट या दिवशी ‘इचलकरंजी बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. याची सांगता सायंकाळी ५ वाजता मानवी साखळीने होईल, अशी माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रसंगी सर्वश्री सनतकुमार दायमा, शिवजी व्यास, प्रवीण सामंत, अमृत भोसले, मंगेश मस्कर, प्रसाद जाधव, कपिल शेटके, सर्जेराव कुंभार, अरविंद शर्मा, सुजित कांबळे उपस्थित होते.