भ्रमणभाष चोरी करणारी धर्मांधांची टोळी अटकेत !

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – विविध राज्‍यांमध्‍ये भ्रमणभाषची चोरी करून त्‍यांचे ई.एम्.आय. क्रमांक पालटून त्‍यांची विक्री करणार्‍या धर्मांधांच्‍या टोळीला गुन्‍हे शाखेने गोवंडी येथून अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून १६ लाख रुपये किमतीचे एकूण १६२ भ्रमणभाष जप्‍त केले आहेत. (सर्वच क्षेत्रांत वाढत असलेल्‍या धर्मांध गुन्‍हेगारांना कठोर शासन झाल्‍यावरच अशा प्रकारांना आळा बसेल ! – संपादक)

१. गोवंडी-शिवाजीनगर येथील बैंगणवाडी परिसरात काही जण मोठ्या प्रमाणात चोरी केलेले भ्रमणभाष विकत असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी तेथे धाड घातली. या वेळी पोलिसांना एका घरात भ्रमणभाषचा मोठा साठा मिळाला.

२. तेथे असलेल्‍या तौसीब सिद्धीकी, मेराज शेख आणि रजा शेख या तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले. त्‍यांनी हे भ्रमणभाष विविध राज्‍यांतून चोरल्‍याचे मान्‍य केले.

३. गोवंडी परिसरातच या भ्रमणभाषचे ई.एम्.आय. क्रमांक पालटले जात होते. ते पालटणार्‍या दुकानावरही याच वेळी धाड घालून पोलिसांनी असिफ शहा आणि जहांगीर जाहिद यांना अटक केली.