पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जुलै-ऑगस्ट महिन्यात इयत्ता १०वी अन् इयत्ता १२वीच्या पुरवणी परीक्षा चालू आहेत. दहावीची २६ जुलै या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी ‘विज्ञान’ आणि ‘तंत्रज्ञान भाग २’ या विषयांची परीक्षा अतीवृष्टीमुळे होऊ शकली नाही. त्याऐवजी या विषयांची परीक्षा आता ३१ जुलै या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होईल, तर बारावीच्या २६ जुलै या दिवशी होणार्‍या ‘वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन’, ‘अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान’, ‘एम्.सी.व्ही.सी. पेपर २’ या विषयांच्या परीक्षा आता ९ ऑगस्ट या दिवशी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.