ठाणे येथे विसर्जन मिरवणुकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणेवर मुसलमानांचा आक्षेप !

ठाणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – येथील मुसलमानबहुल राबोडी परिसरातून बजरंग दलाच्या वतीने ५ दिवसांच्या श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत हिंदुत्वनिष्ठ घोषणा देत होते.

नूर मस्जिद आणि जुम्मा मस्जिद राबोडी क्र.१ येथील नाक्यावर आल्यावर ‘राबोडी और ठाणे का बच्चा बच्चा, जय श्रीराम बोलेगा’ अशा घोषणा दिल्याचे सांगत मुसलमान समाजाने आक्षेप घेतला असून राबोडी पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज केला आहे. यात मुसलमानांच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांशी संपर्क होऊ शकला नाही.

संपादकीय भूमिका :

हिंदुबहूल देशात हिंदूंना घोषणा देण्यासाठी आक्षेप घेण्यास हे पाकिस्तान आहे का ?