श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा अभयवर्धने यांनी मानले भारताचे आभार !

नवी देहली – भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले. श्रीलंका आर्थिक संकटात असतांना भारताने केलेल्या साहाय्यासाठी त्यांनी आभार मानले. गेल्या वर्षी श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या वेळी भारताने आपुलकी दाखवत श्रीलंकेला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सुमारे ४ अब्ज डॉलर्सचे (सुमारे ३३ सहस्र कोटी ४६ रुपयांचे) साहाय्य केले होते.
“I must tell you, during the trouble that we had last year, you (India) saved us, India saved us otherwise, there would have been another bloodbath for all of us. So, that is how India came to help us,” Abeywardena said.https://t.co/LrqpSjeRvA
— Economic Times (@EconomicTimes) July 8, 2023
महिंदा यापा अभयवर्धने यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले आणि अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत म्हटले की, येथे तुमचे (भारताचे) राजदूत आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !