श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा अभयवर्धने यांनी मानले भारताचे आभार !

नवी देहली – भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले. श्रीलंका आर्थिक संकटात असतांना भारताने केलेल्या साहाय्यासाठी त्यांनी आभार मानले. गेल्या वर्षी श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या वेळी भारताने आपुलकी दाखवत श्रीलंकेला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सुमारे ४ अब्ज डॉलर्सचे (सुमारे ३३ सहस्र कोटी ४६ रुपयांचे) साहाय्य केले होते.
“I must tell you, during the trouble that we had last year, you (India) saved us, India saved us otherwise, there would have been another bloodbath for all of us. So, that is how India came to help us,” Abeywardena said.https://t.co/LrqpSjeRvA
— Economic Times (@EconomicTimes) July 8, 2023
महिंदा यापा अभयवर्धने यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले आणि अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत म्हटले की, येथे तुमचे (भारताचे) राजदूत आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता