
१. हनुमान जयंतीच्या दिवशी अकस्मात् एक माकड उडी मारून साधकाच्या चारचाकी गाडीवर बसणे आणि ‘नामाची आठवण करून देण्यासाठी हे घडले असेल’, असा साधकाचा भाव असणे
‘१६.४.२०२२ या दिवशी हनुमान जयंती होती. दुसर्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन होता. हनुमान जयंतीच्या दिवशी मी कामावरून दुपारी २ वाजता बाहेर पडलो. माझी मुलगी कु. अवनी प्रतिदिन पणजीहून बसने याच सुमारास फर्मागुडी (गोवा) येथे पोचते. ती आल्यावर नेहमीप्रमाणे आम्ही मनोमन प्रार्थना केली आणि घरी जाण्यासाठी निघालो. एवढ्यात अकस्मात् शेजारच्या झाडावरील एक माकड उडी मारून आमच्या चारचाकी गाडीवर बसले. मी अवनीला म्हणालो, ‘‘आज हनुमान जयंती आहे.’’ अधिक विचार न करता मी मनोमन हनुमंताला साष्टांग दंडवत घातला. अंदाजे ३० सेकंद ते माकड चारचाकी गाडीवर बसले होते. ‘या मूढ जिवाला नामाची आठवण करून देण्यासाठी हे घडले असेल’, असा भाव मी ठेवला.
२. ‘प्रत्यक्ष हनुमंतच ‘तुमच्यावर कृपा आहे’, हे सांगण्यासाठी वानराच्या रूपातून आले’, असे प.पू. दास महाराज यांनी सांगणे
त्याच दिवशी दुपारी ४ नंतर मी आणि अवनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सेवा करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात गेलो. आपल्याला जे कळत नाही, ते संतांना विचारावे; म्हणून मी सेवा करून घरी आल्यावर प.पू. दास महाराज यांना भ्रमणभाषद्वारे फर्मागुडी येथे घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘त्या ठिकाणी अनेक गाड्या असतांना नेमके तुमच्या गाडीवरच ते माकड चढून का बसले ? ते माकड म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाची सेवा, म्हणजेच श्रीरामाची सेवा ! ‘माझी तुमच्यावर कृपा आहे’, असे आश्वस्त करण्यासाठीच मारुतिराया आला होता.’’
३. प.पू. दास महाराज यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना साधकाला आलेली अनुभूती
‘प.पू. बाबांच्या (प.पू. दास महाराज यांच्या) प्रत्येक शब्दागणिक माझ्या शरिराच्या अणूरेणूत चैतन्य भिनत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी निर्विचार अवस्था झाल्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. प.पू. बाबांनीच मला भानावर आणले.’
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, फोंडा, गोवा. (२२.४.२०२२)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !