भ्रमणभाष आणि तत्सम चिनी उत्पादनांच्या खरेदीत मात्र वाढ !

नवी देहली – अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील यांगत्से येथील सीमेवर चीन आणि भारत सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल’ या एका सामाजिक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून गेल्या वर्षभरात १० पैकी ६ लोकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातल्याचे समोर आले आहे.
१. या संस्थेने देशातील ३१९ जिल्ह्यांतून वेगवेगळ्या शहरांमधील ४० सहस्रांहून अधिक लोकांची मते घेतली.
२. यात लोकांना विचारण्यात आले की, गेल्या वर्षभरात चिनी उत्पादनांची खरेदी अल्प होण्यामागील कारण काय आहे ? यावर ५८ टक्के लोकांनी सांगितले की, चीनसमवेत चालू असलेल्या तणावामुळे त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला आहे.
३. सर्वेक्षणात २८ टक्के लोकांनी, ‘मूल्य, गुणवत्ता आणि चांगली ग्राहक सेवा यांमुळे भारतीय उत्पादनांची खरेदी करत आहोत’, असे सांगितले. ११ टक्के लोकांनी म्हटले की, केवळ गुणवत्ता आणि मूल्य पाहून भारतीय उत्पादने घेत आहोत. ८ टक्के लोकांनी अन्य विदेशी उत्पादनांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. तसेच ८ टक्के लोकांनी असेही सांगितले की, त्यांना आवडीची उत्पादने किंवा नामांकित आस्थापनांची उत्पादने ऑनलाईन मिळाली नसल्याने त्यांना चिनी उत्पादने विकत घ्यावी लागत आहेत.
४. ३५ टक्के लोकांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात त्यांनी चिनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने विकत घेतली. तसेच १४ टक्के लोकांनी सणांच्या वेळी चिनी आस्थापनांचे रोषणाईचे दिवे विकत घेतले.
५. ५९ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या भ्रमणभाषमध्ये एकही चिनी अॅप नाही, तर २९ टक्के लोकांच्या भ्रमणभाषमध्ये १ किंवा त्याहून अधिक अॅप आहेत, अशी माहिती दिली.
६. सर्वेक्षणानुसार अद्यापही भारतात चिनी भ्रमणभाष किंवा तत्सम उत्पादनांची विक्री अधिक आहे आणि ती वाढत आहे.
संपादकीय भूमिका
|
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !