
दापोली (रत्नागिरी) – तालुक्यातील सोंडेघर येथे हिंदु, मुसलमान आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी एकत्र येत १०० वर्षांचा सलोख्याचा करार केला आहे. राजकारण्यांकडून काही ना काही धार्मिक सूत्रे पुढे आणून वाद निर्माण केला जातो. त्याचा परिणाम गावातील शांततेवर होऊ न देण्याचा निर्णय सोंडेघरवासियांनी घेतला आहे. ‘सामाजिक सलोखा यापुढेही कायम रहायला हवा’, यासाठी २५ एप्रिल या दिवशी एका बैठकीत हा करार करण्यात आला. या बैठकीला दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पालगडचे अंमलदार विकास पवार, मिलिंद कदम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोकणातील 'या' गावात 100 वर्षांचा सामाजिक सलोख्याचा करारhttps://t.co/9D5IVHIaSg
— ABP माझा (@abpmajhatv) April 30, 2022
सोंडेघर गावातील हिंदू, मुसलमान आणि बौद्ध गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र रहात आहेत. तीनही धर्मांतील सण आणि उत्सवांना सर्वजण एकत्र येत असतात. काही कौटुंबिक किंवा धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मांतील वयस्कर मंडळी एकत्र येऊन सामोपचाराने वाद मिटवतात. त्यामुळे या गावातील वाद गावाबाहेर जात नाही, तसेच गावातील कोणताही वाद पोलीस ठाण्यापर्यंत नेला जात नाही. गावातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारा हा करार भावी पिढीलाही बंधनकारक रहाणार आहे.
दापोली तालुक्यात यापूर्वींही वर्ष २०१५ मध्ये बुरोंडी गावामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये सलोखा राखण्यासाठी १०० वर्षांचा करार करण्यात आला आहे. असा करार करणारे सोंडेघर हे दुसरे गाव आहे.
संपादकीय भूमिकाअसे जर एका छोट्याशा गावात होत असेल, तर ते संपूर्ण देशात का होऊ शकत नाही ? |
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस