वडाचे झाड कोसळून २ घंटे वाहतूक ठप्प

कोल्हापूर, २१ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. २१ जुलै या दिवशी दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. रंकाळा तलाव्याच्या पाण्यातही वाढ होत असून तलावातील पाणी सांडव्यावरून वहात आहे. पावसामुळे काही उपनगरांमधील वीज खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ घंट्यांसाठी अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर एके ठिकाणी वडाचे मोठे झाड कोसळल्याने दोन घंटे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने झाड तोडून वाहतूक पूर्ववत केली.
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील विविध कामांचा शुभारंभ आज होणार !