मंदिराबाहेर क्रिकेट खेळण्यास रोखल्याने केले आक्रमण
देवबंद (उत्तरप्रदेश) – येथे रामलीला मैदानावरील श्री बालाजी धाम मंदिराबाहेर क्रिकेट खेळणार्या मुसलमान मुलांना थांबवल्यानंतर मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीत मंदिराचे २ सेवक घायाळ झाले. या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना १९ एप्रिलला सायंकाळी घडली.
Ah yes, the “peaceful” reaction — pelting stones at Balaji Dham Mandir in Deoband (U.P.) after being told not to play cricket outside. 🏏⛩️
Two sevaks injured, of course.
Despite Yogi govt’s tough stance on law & order, some still feel entitled enough to attack temples like… pic.twitter.com/jpfGZABThA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2025
क्रिकेट खेळतांना चेंडू मंदिराच्या आत गेला. मंदिराचे सेवक बाहेर आले आणि त्यांनी मुलांना येथे खेळण्यापासून रोखले. (हिंदु मुले मशिदीबाहेर क्रिकेट खेळत असती आणि चेंडू मशिदीत गेला असता, तर मुसलमानांनी क्रिकेट खेळू दिले असते का ? – संपादक) यावरून वाद झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिथे ३५ ते ४० मुसलमानांचा जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक चालू केली. यात मंदिराचे सेवक विजय प्रजापती आणि अंश शर्मा घायाळ झाले.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करत असतांनाही धर्मांध मुसलमानांकडून मंदिरांवर आक्रमण करण्याचे धाडस होते, यावरून त्यांच्यात अद्यापही किती उद्दामपणा मुरलेला आहे, हे दिसून येते ! |