शेकडो लोकांचे स्थलांतर
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – ऐन उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू झाला. रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे शेकडो रहिवासी विस्थापित झाले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. हवामान खात्याने या संदर्भात आधीच चेतावणी दिली होती. श्रीनगरला जाणारी विमान वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे.