सनातन संस्थेच्या वतीने भावपूर्ण वातावणात ‘ऑनलाईन सत्संग सोहळ्या’चे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – कोरोना महामारी आणि चक्रीवादळे ही संकटे आगामी भीषण आपत्काळाची नांदी आहे. अशा स्थितीत ईश्वराची भक्तीच आपल्याला तारणार आहे. अध्यात्म हे पंचमहाभूते आणि ईश्वराची निर्गुण शक्ती यांच्याशी संबंधित आहे. अध्यात्म व्यापक असून विज्ञान अत्यंत मर्यादित आहे. सध्याच्या आपत्काळात चांगली साधना करून ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक आहे. सध्याचा आपत्काळ हा धर्मकार्यासाठी संपतकाळ आहे. त्यामुळे आपण तन, मन आणि धन यांचा त्याग करून सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.
‘समाजाने साधना करून आत्मबळ निर्माण करावे’, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या ८ मासांपासून ‘ऑनलाईन’ सत्संग श्रृंखलेचे आयोजन करण्यात येते. या श्रृंखलेतील जिज्ञासूंसाठी संस्थेच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या भावपूर्ण सोहळ्याचा लाभ बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, बंगाल आणि आसाम आदी राज्यांतील अनेक जिज्ञासूंनी घेतला. या वेळी सोहळ्यामध्ये ‘अनुभवकथन’ या सत्रात जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुलिका शर्मा यांनी केले.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी