
सोलापूर – शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अल्प होत आहे. जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये ‘ऑफलाईन’ पद्धतीने शाळा चालू करण्यात याव्यात, त्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
मागील दीड वर्षापासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने अध्यापनाचे काम चालू आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या पुष्कळ शाळांमधील मुलांकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ‘अँड्रॉइड भ्रमणध्वनी’ नाहीत. ‘ऑनलाईन’ शिक्षणापासून पूर्णत: दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनामुक्त गावात ‘ऑफलाईन’ पद्धतीने शिक्षण देण्यात यावे, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोनामुक्त गावांतील शाळा चालू करण्याविषयी दिलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकार्यांनी अनुमती दिल्यास शाळा ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू होतील.
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !