या जगात फक्त ‘देव’च न्यायदाता होईल ।

भगवंताच्या प्रेमापुढे हरणं-जिंकणं शून्य असते ।
जिंकणारा तोच एक असतो, तो अजिंक्यच आहे ।
माझा भारत त्याचा आहे, तो भारत अजिंक्य ठरेल ।
कारण धर्माचाच जय होईल, धर्माचाच उदय होईल ।
जग तावून-सुलाखून निघेल । या जगात फक्त ‘देव’च न्यायदाता होईल ॥

– पुष्पांजली, बेळगाव (फेब्रुवारी २०१४)