महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका ! – केअर रेटिंग एजन्सी

मुंबई – महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, असे अनुमान ‘केअर रेटिंग एजन्सी’ने व्यक्त केले आहे. याचा परिणाम व्यापार, हॉटेल आणि वाहतूक यांवर झाला आहे.

यामुळे आर्थिक घडामोडींमध्ये ०.३२ टक्के इतकी घट होऊ शकते. याचा उत्पादन आणि विक्री यांवर परिणाम होऊ शकतो.