महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

पूजोपचाराविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महाशिवरात्री हे व्रत माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला करतात. महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना, अभिषेक, पूजा आणि जागरण करण्याची परंपरा आहे. महाशिवरात्रीला (२१.२.२०२० या दिवशी) सनातनच्या काही साधकांनी धामसे (गोवा) येथील पू. भय्याजी यांच्या आश्रमात शिवपिंडीवर अभिषेक केला. ‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – शिवपिंडीवर अभिषेक केल्याने साधकांवर सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

सौ. स्वाती सणस

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

२. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. महाशिवरात्रीला शिवाची उपासना केल्यामुळे वाईट शक्तींचा दाब न्यून होणे : ‘भगवान शिव माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरांपैकी एका प्रहरी विश्रांती घेतो. (महाशिवरात्रीला शिवपूजनाची वेळ उत्तररात्री १२ ते १.३० या कालावधीत असते. हा काळ साधारण दीड घंट्याचा आहे.) महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र पुढीलप्रमाणे आहे. ‘शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्‍वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्या वेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून अधिकाधिक शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर अर्पण करतात किंवा अभिषेक करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.’

(संदर्भ : सनातनचे संकेतस्थळ – https://www.sanatan.org/mr/a/424.html)

२ आ. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होण्याचे कारण : ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीभोवती असलेले त्रासदायक आवरण (नकारात्मक स्पंदने) दर्शवते, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या देहात वाईट शक्तीने निर्माण केलेल्या स्थानातील त्रासदायक शक्ती (त्रासदायक स्पंदने) दर्शवते. या साधकाला वाईट शक्तींचा त्रास असल्याने त्याच्यामध्ये अभिषेकापूर्वी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या. शिवपिंडीला अभिषेक केल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य (शिवतत्त्व) साधकाने त्याच्या क्षमतेनुसार ग्रहण केले. त्यामुळे त्याच्या देहातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती, तसेच त्याच्या भोवतीचे त्रासदायक आवरण न्यून झाले. त्यामुळे त्याच्यातील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा न्यून झाल्या.

२ इ. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्याचे कारण : या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा होती. शिवपिंडीला अभिषेक केल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य (शिवतत्त्व) साधकाने ग्रहण केले. त्यामुळे त्याच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.’

– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.८.२०२०)

ई-मेल : [email protected]