पथकरमुक्तीसाठी आंदोलन करावे लागल्यास खासदारांच्या समवेत राहू
पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?
सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – गत अनेक वर्षांपासून आनेवाडी पथकरनाक्याचा प्रश्न गाजत आहे. रस्ते दुरुस्ती असेल किंवा स्थानिकांना पथकरमुक्ती हवी असेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार जिल्हा प्रशासनाला जुमानत नाहीत. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पथकरमुक्तीविषयी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. ज्याप्रकारे खासदार सुप्रिया सुळे यांनी खेड-शिवापूर पथकरनाक्याविषयी आंदोलनाची भूमिका घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहनांसाठी पथकरमुक्तीचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे खासदार भोसले आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा तसेच कराड येथील पथकरमुक्तीसाठी निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागल्यास मी स्थानिक आमदार म्हणून दोन्ही खासदारांच्या समवेत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत स्थानिकांना पथकरमुक्ती मिळावी, यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. रस्ते दुरुस्ती, पथकरामध्ये सवलत याविषयी जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या कोणत्या बैठकीस ठेकेदार किंवा संबंधित अधिकारी उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्न सोडवू शकत नाही. पथकरनाक्यावर बनावट देयके दिली जात असल्याचे नुकतेच उघड झाले आहे. यामुळे पथकरनाके हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे, हे सिद्ध झाले आहे. पथकरनाक्यावरील भ्रष्टाचार आणि स्थानिक वाहनांना पथकरमुक्ती ही मिळालीच पाहिजे.’’-
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !