आद्य शंकराचार्यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

आद्य शंकराचार्यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंमध्ये दुही निर्माण करणारे राष्ट्रविरोधीच !

हिंदूंमध्ये दुही निर्माण करणारे राष्ट्रविरोधीच !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदु आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्र आणि धर्म विरोधी होत !’

बालवयातील मुलांसारखे बुद्धीप्रामाण्यवादी !

बालवयातील मुलांसारखे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्‍वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आदर्श हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य !

आदर्श हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य !

‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यातील भेद !

संत आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यातील भेद !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार !

भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार !

‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नागरिकांच्या आत्महत्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे उत्तरदायी !

नागरिकांच्या आत्महत्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे उत्तरदायी !

‘पाश्‍चात्त्य देशांत अन्न-वस्त्र-निवारा असूनही मानसिक अस्वास्थ्यामुळे तेथील नागरिक आत्महत्या करतात. याउलट भारतातील जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सरकारांनी पूर्ण न केल्यामुळे येथील नागरिक आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण आवश्यक !

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत. ‘या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्तमानकाळाचे सोने करा !

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ