आगामी हिंदु राष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचा निकष !
‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात अन् पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने . . . ते अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवजातही नष्ट होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
भक्तांनी भक्तीभावाने मंदिरांत अर्पण केलेले धन मंदिरांचे सरकारीकरण करून लुबाडणारे सर्वपक्षीय राजकारणी, म्हणजे आई-वडिलांची संपत्ती कह्यात घेऊन ती उधळून टाकणारी वाह्यात मुले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर . . . उद्धार होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बंगाल आणि केरळ येथील हिंदूंनी ३० वर्षांहून अधिक काळ साम्यवाद स्वीकारला; म्हणून ते हिंदुत्वापासून दूर गेले. त्यामुळे त्यांच्यात धर्माभिमान उरला नाही. म्हणूनच ते सद्य:स्थितीत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमणांना तोंड देऊ शकत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले